UPSC Topper Rajat Walke –  गडचिरोली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा !

UPSC Topper Rajat Walke – गडचिरोली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ! UPSC २०२५ चा निकाल नुकताच जाहीर झाला आणि या निकालात रजत वाळके या तरुण अभियंत्याचे नाव झळकले. ९५८ उमेदवारांची आयोगाने निवड केली आहे. महाराष्ट्र राज्यातील तब्बल ५९ तरुण तरुणींची निवड झाली आहे. गडचिरोली सारख्या जिल्ह्यातील एका अभियंत्याने ही परीक्षा दमदार पद्धतीने उत्तीर्ण करून जिल्ह्यातील तरुणांना एक आदर्श प्रस्थापित केला आहे. UPSC परीक्षेत ५१४ वी रँक मिळवून राज्याचे नाव मोठे केले आहे. हे यश गडचिरोली जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षण गडचिरोली जिल्ह्यातच पूर्ण केल्यानंतर JEE सारखी अत्यंत कठीण स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून रजत याने NIT नागपूर येथून संगणक शास्त्रातून अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली आहे. अभियांत्रिकी पदवी प्राप्त केल्यानंतर साहजिकच अनेक नामांकित भारतीय किंव्हा बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये त्याला नोकरी करता आली असती. पण त्याचे ध्येय वेगळे होते आणि नोकरी करण्यापेक्षा केंद्रीय नागरी सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून तो तयारीला लागला. रजतच्या वडिलांचेही स्वप्न होते आपल्या कुटुंबातील मुलांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत दाखल व्हावे. वडिलांचे ते स्वप्न रजतने पूर्ण केले आहे. पण ते यश पाहण्यासाठी आणि आपले पूर्ण झालेले स्वप्न डोळ्यांनी बघण्याचे भाग्य मात्र त्याच्या वडिलांना लाभले नाही. अत्त दिप भव! या तथागत भगवान बुद्धांच्या निर्वाणीच्या संदेशनुसार काहीही अशक्य नाही हे रजतने सिद्ध करून दाखवले आहे. आज खऱ्या अर्थाने गडचिरोली जिल्हा गौरानन्वित झाला आहे. येणाऱ्या तरुणांना राजतच्या रूपाने एक मार्गदर्शक दिपस्थान प्राप्त झाले आहे. इच्छाशक्ती असेल तर अशक्य काहीच नाही हे रजतने सिद्ध केले आहे. कुटुंब प्रमुख वडील हयात नसतानाही खचून न जाता त्याने विजयश्री खेचून आणली आहे. एक आदर्श निर्माण केला आहे. सर्वत्र त्याच्या यशाचे कौतुक केले जात आहे. “Dream Big and Start Today” हा अत्यंत मौलिक संदेश त्यांनी तरुणांना दिला आहे. “जेवढे तुमचे मोठे स्वप्न राहतील तेवढे तुमचे प्रयत्न राहतील. जेवढे शक्य असेल तेवढ्या लवकर स्वतःला यासाठी झोकून द्यावे”. असा संदेश दिला आहे. रजतच्या निमित्ताने गडचिरोली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तरुणांनी आपले लक्ष विचलित न करता शिक्षण आणि ज्ञानावर लक्ष घालावे आणि आपले स्वप्न पूर्ण करावे अशा news4pm.com कडून शुभेच्छा! Visit for UPSC Exam Best IAS Books Recommended for UPSC Civil Service Examination JEE Advanced 2026 Preparation Strategy

Read More

Samagra Employees on Strike. कंत्राटी कर्मचारी रस्त्यावर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे अहवाल सादर

Samagra Employees on Strike समग्र शिक्षा योजनेचे कंत्राटी कर्मचारी पुन्हा एकदा आंदोलनात उतरले आहेत. आजचा तिसरा दिवस आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात बेमुदत आंदोलन केल्यावर पदरी घोर निराशा पडल्याने ऐन मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच समग्र शिक्षा योजनेचे कर्मचारी मुंबईच्या आझाद मैदानावर एकवटले आहेत. समग्र शिक्षा योजनेच्या अर्ध्या कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत घेऊन शासन उर्वरित कर्मचाऱ्याचे बोळवण करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात आचार संहिता संपल्यावर आपल्या सर्वाना नियमित करू असे आश्वासन दिल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपले अन्नत्याग आंदोलन सोडले होते. शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि शिवा संघटनेचे झुंझार नेते प्रा. मनोहर धोंडे यांनी मुख्यमंत्र्यांच्यावतीने जाहीर आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री यांच्या आश्वासनावर विश्वास ठेऊन बेमुदत आंदोलनाला स्थगिती देण्यात आली होती. परंतु २ महिने उलटूनही कोणताही निर्णय झाला नसल्याने वैफल्यग्रस्त कर्मचारी आपली व्यथा, दुःख घेऊन आंदोलनात पुन्हा एकदा उतरले आहेत. शिक्षण विभाग मात्र या सर्व गोष्टीपासून अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना आयुष्यातून उठविण्याचे खरे काम समग्र शिक्षा विभागाच्या मुख्य कार्यालय महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने केले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कायम शोषण करण्यात या विभागाने आसुरी आनंद उपभोगला आहे. हजारो कंत्राटी कर्मचारी असताना त्या कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रतीचे जीवनमान जगता येईल याकडे सोयीने दुर्लक्ष केले आहे. कोणतेही लाभ या कर्मचाऱ्यांना आजपर्यंत लागू होऊ दिले नाही. कायम सापत्न वागणूक देण्याचे काम केले आहे. ३१ मार्च २०२६ ला समग्र शिक्षा योजना संपुष्टात येणार आहे. पण यानंतर काय? या योजनेचे काय? या उपक्रमाचे काय? शाळा बाह्य मुलांचे काय? वाहतूक सेवेचे काय? RTE Act मधील तरतुदींचे काय? मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेष योजनेचे काय? दिव्यांग विद्यार्थी, त्यांच्या मूलभूत सोयी, भौतिक सुविधा, गुणवत्ता पूर्ण शिक्षण, शिक्षण प्रशिक्षण, त्यासाठी केंद्र शासनाकडून येणारा निधी  याबाबत समग्रच्या राज्य कार्यालयाकडून कोणतेही दिशा निर्देश नाहीत. समग्र शिक्षा योजनेला पुढे सुरू ठेवायचं कि नाही याबाबत केंद्र शासनाचे जाहीर केलेले नाही.  त्यामुळे २० – २५ वर्षे सलग सेवा केल्यावर आयुष्य उद्ध्वस्त होईल या भीतीने कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलनाचा पवित्र घेतला आहे. मात्र संपूर्ण शिक्षण मंत्रालय ढिम्मं दिसून येत आहे.  कायम करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने अहवाल शासनास सादर केला असला तरी त्या अहवालाचे पुढे काय झाले कळायला मार्ग नाही.  या मंत्रालयाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जात असल्याचे दिसून येत नाही. एकूणच समग्र योजनेचा आणि कंत्राटी कर्मचारी यांचा कोणी वाली नाही असे दिसून येत आहे.. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना भेटण्यास गेलेल्या महिलाधाडसी निर्णय घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कर्मचाऱ्यांना काय न्याय देतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष एकवटले आहेत.  ८ मार्च हा जागतिक महिला दिवस असताना समग्र शिक्षा योजनेतील कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांना आंदोलनासाठी मुंबई गाठावी लागली आणि ९ मार्च पासून मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्याची पाळी आली.  दर्जेदार शिक्षणासाठी झटणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी समितिने अहवाल सादर केला असून तो अहवाल मुख्यमंत्री यांच्याकडे स्वतः शालेय शिक्षण मंत्री आतातरी घेऊन जातील आणि कंत्राटी पद्धतीचे गुणवत्ता शिक्षण शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येईल अशी अपेक्षा करू या!

Read More